top_advertise_img

आदिवासींच्या विविध संघटनांचे धरणे आंदोलन

By The Journalists
आदिवासींच्या विविध संघटनांचे धरणे आंदोलन

वसई:आदिवासी समाजाचे अस्तित्व वसई तालुक्यात टिकविण्यासाठी तसेच, सदर समाजाला उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी व शासकीय अनास्थेमुळे सुविधा न मिळणे यामुळे आदिवासीना कुचंबणा सहन करावी लागत आहे. या विरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती वसई कार्यालयासमोर तर, आदिवासी एकता परिषदे मार्फत वसई तहसीलदार कार्यालयासमोर, भारताचा कम्युनिस्ट पक्ष क्मार्क्सवादी) लाल बावटा यांचे उपविभागीय कार्यालय, वसई समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. समजी संघटनेने विविध जिल्ह्यात ठिकाणी २१ ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केली होती. वसईतील संघटनेचे आंदोलन हे बेमुदत स्वरूपाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जल जीवन योजनेअंतर्गत पिण्याचे पाणी, वन हक्काची मान्यता, बालकांना मोफत शिक्षण कायदा, वेट बिगारांना पुनर्वसन करणे, इत्यादी विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते आदिवासी एकता परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजनाची अंमलबजावणी करण्यात यावी, जे पाडे डोंगराच्या पायथ्याशी आहेत, ज्या पाड्यात सतत पावसाचे पाणी साचते त्या पाड्यांसाठी अत्यंत तातडीची जागा बदली व पुनर्वसन योजना करणे, झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत पाड्यांचे अस्तित्व संपवून इमारतीमधे घरे (म्हाडा) देण्यात येत आहेत, वसई तालुक्यातील सर्व तलावांचे सुशोभिकरणकरून आदिवासीचे अस्तित्व संपवले जात आहे, बुलेट ट्रेनसाठी जागा, मेट्रो ट्रेनसाठी जागा भूसंपादन करून आदिवासी हद्दपार होत आहे, वसई तालुक्यातील सर्व रस्त्याचे रूंदीकरण करून रस्त्यात येणाऱ्या घरांचे दूसरीकडे विस्थापन केलं जात आहे या विरोधात धरणे आंदोलन आयोजित केलं होतं., सागरी महामार्गासाठी जागा (कोस्टल उपलब्ध करून दिली जात आहे, वसई तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी दिली जाणारी जागा, वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी जाणारी जागा, वसई तालुक्यात फिरणाऱ्या रिंगरूट व रेल्वेसाठी जागा, आदिवासी वस्ती सुधार योजना, आदिवासी पाड्यांच्या जागेवर विविध प्रकारचे आरक्षण टाकून आदिवासी पाड्यांचे अस्तित्व संपवणे, अशा प्रकारच्या विविध योजना राबवून वसई तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली आदिवासी समाज संपवला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर ठिय्या आंदोलनातील प्रमुख मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. वसई तालुक्यातील पारंपारीक आदिवासी पाड्यांची नोंद त्वरित त्या पाड्याच्या सात बारा उताऱ्यावर करणे, वसई तालुक्यातील भूमीहीन आदिवासी समाज्याच्या लोकांच्या घराखालील जमिन व घराशेजारील वहीवाटीची जमिन नावे करून त्वरित सात बारा वाटप करणे, वसई तालुक्यातील भूमीहीन आदिवासी समाज्याच्या लोकांना भूमीहीन दाखले वाटप करणे, आदिवासी समाज्याच्या बांधवाना, दुय्यम रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड, नविन रेशन कार्ड, देताना जुन्या रेशन कार्ड पध्दतीची पुस्तिका ऑनलाईन करून त्वरित देण्यात यावी, अर्नाळा येथीत भूमाफियांना पाठीशी घालणारे मंडळ अधिकारी आगाशी मनिलाल साबळे यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांना त्वरित कायम स्वरूपी निलंबित करावे, अर्नाळा शांतीनगर येथिल भूमाफिया पोगेरी कुटुंबावर त्वरित फौजदारी गुन्हा नोदवून कार्यवाही करणे तसेच सदर पोगेरी कुटुंबाने शासकीय गुरचरण जागेवर बांधलेले अनधिकृत व्यापारी गाळे व भाडयाने दिलेले रूम चाळीवर त्वरित तोडक कारवाई करून आदिवासी व इतर लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता मोकळा करावा, आदिवासी समाज्याच्या लोकांनी उदर निर्वाहासाठी केलेले भातशेतीचे अतिक्रमण त्वरित नियमाकुल करावे., आदिवासी समाजाची कामे वेळेवर न करता ती जाणीवपूर्वक महीनों महीने रखडवली जातात.,आदिवासी समाज्याच्या लोकांना मुलभूत हक्का पासुन वंचित ठेवणाऱ्या तलाठ्यावर त्वरित कारवाई करावी, वसई तालुक्यातील सरकारी जागेवरील पारंपारीक आदिवासीं पाड्यांची जागा कोणत्याही सरकारी किवा निमसरकारी संस्थेला वर्ग करू नये. भारतीय राज्य घटनेच्या आदिवासी पेसा कायद्या अंतर्गत कायम स्वरूपी सरकारी १७ पदांची नोकर भरती त्वरित करण्यासाठी शासनाकडे वसई तालुक्यातून प्रस्ताव सादर करावा. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत वन जमिनी व वनपट्टे मंजूर करणे जमिनीच्या पीक पाळण्याची नोंद करणे रेशन व्यवस्थेचे सर्वत्रीकरण महावितरण कडून होणारी फसवणूक बंद करणे वसई तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांसाठी नुकसान भरपाई चा मोबदला देणे, पेसा कायदा अंतर्गत रिक्त जागा भरणे इत्यादी विविध मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे मांडण्यात आल्या. सोमवारी सदरच्या विविध आदिवासी संघटनांमार्फत विविध शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे शासकीय कामकाज जवळपास ठप्प झाले होते.

राष्ट्रीय
सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक  - ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...

नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई
मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा सोना जप्त

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...

मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण, सरकारकडे मदतीची मागणी

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...

भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीनांचा मृत्यू

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...

मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला

वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Sports
...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

...

Cyber Attack on Uttarakhand's Government System

Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

More Local News To You

Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.

Trending In Business
Trending In Business

Stay Connected

top-ad-banner
For You
वसई विरार
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर

विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...

वसई विरार
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार

वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...

वसई विरार
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू

वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...