भारत जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था बनली - उपराष्ट्रपती

नवी दिल्ली:भारत ही आता जगातील सर्वात चैतन्यशील अर्थव्यवस्था बनली असून जागतिक गुंतवणुकीसाठीचे पसंतीचे स्थान झाली आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले. ग्रेटर नोईडा परिसरात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2024 च्या दुसऱ्या आवृत्तीत आज उद्घाटनपर भाषण करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “आज भारत ही 4 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ घातली असून आगामी दशकांमध्ये 8% दराने देशाचा विकास होण्याची क्षमता आहे. भारत हा आता जगाच्या दृष्टीने मोठ्या घडामोडींनी भरलेला देश असून उत्तर प्रदेश हे राज्य तर विविध उपक्रमांनी युक्त आहे.” भारतातील पायाभूत क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीवर भर देत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आपला देश आता मेट्रो रेल्वेच्या जाळ्याच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि देशात विमानतळ असलेल्या शहरांची संख्या 70 वरुन आता 140 वर पोहोचली आहे. सुमारे 800 दशलक्ष ब्रॉडबॅंड वापरकर्ते असलेला भारत आता जागतिक पातळीवर सर्वात मोठा कनेक्टेड देश झाला आहे.” “डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत, भारताने दरमहा 13 अब्ज व्यवहारांसह जगातील उच्चांक गाठला आहे. त्याशिवाय, आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था बनलो असून, आपल्या देशात 117 युनिकॉर्न उद्योग कार्यरत आहेत तसेच भारत जगातील तिसरा सर्वाधिक क्रयशक्ती असलेला देश झाला आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी सेमिकंडक्टर उद्योगांचे महत्त्व देखील अधोरेखित केले. ते म्हणाले, “आपल्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा उद्योग वर्ष 2026 पर्यंत 55 अब्ज डॉलर्सच्याही पुढे पोहोचेल अशी अपेक्षा आहे. हे शतक भारताचे शतक आहे याबाबत मला यत्किंचितही शंका नाही.” यासोबतच, भारताने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमापासून “संकल्पना, संरचना आणि मेक इन इंडिया” पर्यंत जी उल्लेखनीय झेप घेतली आहे त्यावर देखील उपराष्ट्रपतींनी अधिक भर दिला. या व्यापार प्रदर्शनामध्ये व्हिएतनामला भागीदार देशाचे स्थान देण्याचे महत्त्व देखील त्यांनी ठळकपणे मांडले. एक नैसर्गिक भागीदारी असे या भागीदारीचे वर्णन करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की ही भागीदारी दोन्ही देशांच्या दरम्यान सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल आणि जगाच्या दक्षिणेकडील देशांना आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अधिक सशक्त भूमिका निभावण्याच्या निर्धाराला बळकटी देईल.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...