विनाशकारी वाढवण प्रकल्पासाठी मच्छीमार उध्वस्त केला जाईल-संजय कोळी

विरार: पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमारांचे जीवन उदध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराविरोधात शुक्रवारी पालघर जिल्ह्यासह विविध ठिकाणी निषेधाचा सूर उमटला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण येथे सदर बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सरकारला आपल्या भावना पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे ,धरणे, व प्रतिकात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग, पालघर, डहाणू, वसई उत्तन, वर्सोवा इत्यादी ठिकाणी मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध करत उग्र आंदोलने केली. वसईत पाचुबंदर, किल्ला बंदर येथील मच्छीमारांनी वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सदरच्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सामील झाल्या होत्या.
यावेळी आंदोलकांना मार्गदर्शनपर भाषणामध्ये कोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सदर प्रकल्पामुळे येथील जैवविविधता नष्ट करून पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबांना कायमचे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत या प्रकल्पासाठी पर्यावरणाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. अतिशय संवेदनशील असलेल्या तारापूर अणुशक्ती केंद्राची परवानगीही या प्रकल्पास घेण्यात आलेली नाही. सदर प्रकल्पासाठी पाच हजार एकरात माती भराव करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन १७ हजार एकरावर हे बंदर उभे केले जाणार आहे. प्रकल्पासाठी दररोज हजारो बोटी या मार्गातून ये- जा करणार आहेत. येथील पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय हा उथळ पाण्यावरती अवलंबून असतो. १२० फुटांवर सुरू असलेली ही मासेमारी या प्रकल्पामुळे कायमची संपुष्टात येणार आहे. ३७ एकर जागा या प्रकल्पामुळे बाधित झाल्यानंतर मच्छिमार कायमचा उदध्वस्त होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर 'लाडकी बहीण'सारख्या योजना आणल्या जात आहेत. या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे आपण सरकारचे लाडके राहिलेलो नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या सरकारला धडा शिकवण्याचं काम मच्छीमारांनी करावे, या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी जाणीवपूर्वक दिवस तारीख अंधारात ठेवण्यात आली या कालावधीमध्ये मच्छीमार समुद्रात जात असतात. ही वेळ हेरून सदरचे भूमिपूजन घाई गडबडीने उरकण्याचा घाट घालण्यात आला.
परंतु, सरकारच्या दुर्दैवाने समुद्रात आलेल्या वादळामुळे सर्वच भागातील मच्छीमार मच्छीमारीसाठी गेलेले नाहीत. यामुळे आजच्या आंदोलनामध्ये आपल्याला सहभाग घेता आला. हा प्रकल्प अवघे २० ते २५ जण हाताळत आहेत. भांडवलदारांच्या सोयीसाठी हे सुरु असल्याचा आरोप करीत वेळ पडल्यास आपल्या प्रेतावरून या प्रकल्पाचे जेसीबी व डंपर नेण्याची तयारी ठेवावी लागेल. सरकारला जाग आणण्यासाठी या प्रकल्पाच्या जागेवर मच्छीमार बोटी बुडवून आम्हाला नष्ट करण्याची तयारी करावी लागेल. असे प्रतिपादन आंदोलन करताना मार्गदर्शनपर भाषणात करण्यात आले.
यावेळी वाळवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महामार्ग बंद ठेवण्याची पहिलीच घटना असल्याचे आंदोलनकर्त्यांतर्फे सांगण्यात आले. उपस्थितांची समायोजित भाषणे झाली. आम्ही वसईकर संघटनेचे मिलिंद खानोलकर, माजी विरोधी पक्ष नेते विनायक निकम, डॉमणिका डाबरे, कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदीया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा, आम आदमी पार्टीचे जॉन परेरा, एवरेस्ट डाबरे, निर्भय जनमंचचे पायस मच्याडो इत्यादी पदाधिकारी व आंदोलक उपस्थित होते. सदर प्रकल्पाला विरोध स्पष्ट करणारे निवेदन नायब तहसिलदार शशिकांत नाचण व निवासी नायाब तहसिलदार राजाराम देवकाते यांना यावेळी सादर करण्यात आले.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...