अमरावतीत धोक्याची घंटा; 14 दिवसांत डेंग्यूचे 88, तर चिकनगुन्याचे 58 रुग्ण.

अमरावती शहरासह ग्रामीण भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झपाटणे वाढत आहे. मागील सात महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र १ ते १४ ऑगस्ट या १४ दिवसात डेंग्यूचे ८८ रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ११० होती, अशी माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात कीटकजन्य आजाराचे रुग्णही दाखल होत आहे. मनपाची आरोग्य यंत्रणा सतर्क झालीआहे.
आरोग्य विभागाकडून विविध पथके नेमून शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातही विविध उपाययोजना करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे शासकीय रुग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे. त्याबरोबरच जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे निर्माण झालेले दमट वातावरण हे या कीटकजन्य वाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोके दुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांवर दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण भागात डेंग्यूचे ६८ आणि मनपा क्षेत्रात २० असे एकूण तब्बल ८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तर चिकनगुन्याचे ग्रामीण भागात ४० आणि मनपा क्षेत्रात १८ असे एकूण ५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली. १४ ऑगस्टपर्यंत २१ रुग्ण मलेरियाचे आढळले जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांबरोबरच मलेरियाचे देखील रुग्ण आढळून आले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत मलेरियाचे २१ रुग्ण आढळले आल्याची माहिती हिवताप विभागाने दिली. कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, डास चावणार नाही, अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, ताप आल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. सात महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ११०; २४४ नमुने तपासले जिल्ह्यात जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात १ हजार ६६ संशयित रुग्णांचे नमुने तपासले. यामध्ये ११० डेंग्यू पॉझिटिव्ह, तर ४० चिकनगुनिया रुग्ण आढळले होते. तर १ ते १४ ऑगस्ट या काळात २४४ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासले असता, यामध्ये ८८ डेंग्यू तर ५८ चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची एकूण संख्या ही १९८, तर चिकनगुनिया रुग्णांची संख्या ९२ झाली आहे..

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...