माहिती अधिकार कायद्यामागे 10 वर्षांचा संघर्ष!

मुंबई-संजय राणे,
राळेगणसिद्धी : देश व लोकहिताकरता माहिती अधिकार अस्तित्वात यावा, यासाठी तब्बल 10 वर्षे संघर्ष केला. या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकारासह दफ्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, लोकपाल असे तब्बल 10 कायदे अस्तित्वात आले, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे यांनी दिली. देशभरात परिवर्तनाची नांदी ठरलेल्या अनेक आंदोलनांची ठिणगी ज्येष्ठ समाजसेवक-पद्मभूषण आण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतील आई पद्मावती मंदिराच्या प्रांगणातून पेटवली. रविवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता याच वटवृक्षाच्या छायेत आई पद्मावती देवी मंदिराच्या प्रांगणात माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
त्या प्रसंगी आण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आणण्यासाठी कराव्या लागलेल्या अथक प्रयत्नांची कहाणी उलगडून सांगितली. समाजासाठी कौटुंबिक निर्णय घेतले नाहीत. आज 88व्या वर्षांतही जनसेवा करतोय. प्राण पणाला लावले आणि सरकारला कायदे करायला लावले, असे ते म्हणाले.
माणसाने आयुष्याचे ध्येय निश्चित करायला हवे. कार्यकर्त्यांनीही जीवनाचे ध्येय ठरवावे. देवाने जन्म कशासाठी दिलाय, याचा विचार केला पाहिजे. आचार शुद्ध, विचार निष्कलंक असावेत, त्याग केला पाहिजे. अपमान पचवायची शक्ती असावी. व्रत घेऊन काम केले पाहिजे. हे गुण आत्मसात केलात तरच आपण फार मोठे काम करू शकाल, अशा शब्दांत आण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला पुणे येथील यशदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेचे संयोजक आणि संशोधन अधिकारी दादू भुले, यशदा माहिती अधिकार प्रशिक्षिका रेखा साळुंखे, माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष सुभाष बसवेकर व अन्य प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
माहिती अधिकारकायद्यात मिळालेली माहिती हा बॉम्ब : विवेक वेलणकर
माहिती अधिकार कायदा हा लोकोपयोगी कायदा आहे. आपले हक्क जाणून घेण्यासाठीचा कायदा आहे. पण या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची हाकाटी पिटली जाते. मात्र या कायद्याचा सर्वाधिक दुरुपयोग सरकारी अधिकारीच करतात. विशेषतः निवृत्त अधिकारी जास्त दुरुपयोग करतात. कारण त्यांच्या जवळ आता वेळ असतो. त्यांनाच जास्त घोटाळे माहीत असतात, अशी माहिती मेळाव्यातील पहिल्या चर्चासत्रात देऊन माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी हे आरोप धुडकावून लावले.
किंबहुना; माहिती अधिकार कलम 4 मधील 1 ते 17 कलमांतर्गत सर्व माहिती स्वतःहून प्रशासनाने जाहीर करण्याचे निर्देश आहेत. दुर्दैवाने याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे माहिती अधिकार अर्जाची संख्या आपसूक वाढते, या दुसऱ्या निराधार आरोपाकडेही या निरीक्षणाआधारे सर्वांचे लक्ष वेधले. माहिती अधिकार अर्जांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून प्रशासनाने दर सोमवारी प्रत्यक्ष पडताळणी देणे अपेक्षित असते. त्याबाबत शासन परिपत्रक आहे. सोमवारी सुट्टी आली तर त्या दिवशीच्या दुसऱ्या कार्यालयीन दिवशी ही पडताळणी द्यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे. प्रशासनाने स्थानिक भाषेत लोकांना समजेल; अशा भाषेत माहिती देण्याचेही निर्देश आहेत. या सगळ्याची अंमलबजावणी झाल्यास प्रशासनावरचा भार आपसूकच कमी होईल, शिवाय माहिती अधिकार अर्जांचीही संख्या कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान; माहिती अधिकाराचा योग्य वापर करायचा आणि प्रशासनाला निर्णय घेण्यास कसे भाग पाडायचे, याचीही मार्मिक मिमांसा त्यांनी या वेळी केली. महावितरण, महाराष्ट्र शासन व टोल कंपन्यांबाबत केलेल्या पत्रव्यवहाराची उदाहरणे त्यांनी दिली. रस्त्यावरील खड्डे कसे बुजवायाचे; स्पीड ब्रेकर कसे असावेत, याबाबत सरकारचे नियम आहेत. पण आपल्याला ते माहीत नाहीत; पण अधिकाऱ्यांनाही ते माहीत नाहीत, अशी खंत व्यक्त करत या सगळ्या बाबींची माहिती घेतली पाहिजे.
कोणत्या अधिकाऱ्याला किती पगार आहे; याचा बोर्ड कार्यालयाच्या प्रदर्शनी भागात लावण्याचे निर्देश आहेत. कोणत्याही कार्यालयाचे अंदाजपत्रकही जाहीररीत्या प्रदर्शित करण्याचे निर्देश आहेत. पण आपल्याकडे ते प्रसिद्ध केले जात नाही. प्रशासनाला ते प्रसिद्ध करण्यास भाग पाडले पाहिजे, असा आग्रह त्यांनी कार्यकर्त्यांना केला.
1 जानेवारी व 1 जुलै रोजी माहिती अधिकार कलम चारची माहिती अद्ययावत करण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत. या नियमांची अंमलबजावणी होतेय किंवा नाही, याची पाहणी करा. विशेष म्हणजे; माहिती अधिकार कायद्यात मिळालेली माहिती लपवून ठेवू नका; ही माहिती म्हणजे बॉम्ब आहे. ती सार्वजनिक होऊ द्या. प्रशासनाचा भ्रष्टाचार समोर येऊ द्या, असे आवाहन सरतेशेवटी त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सदस्यांना केले. दुपारच्या सत्रात अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शासन व प्रशासन पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असावे. त्यात नागरिकांचा सहभाग असावा, या उद्दात हेतूने माहिती अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात आला. मात्र शासन व प्रशासन पातळीवर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रचंड अनास्था आहे. हा कायदा प्रभावीपणे राबवला जावा. त्याबाबत सजग व जागृकता वाढावी. त्यातून जागरूक व प्रामाणिक नागरिकांचा मोठा दबाव गट निर्माण करून जनतेचा शासन व प्रशासनातील सहभाग वाढावा, हा या अधिवेशन आयोजनामागचा उद्देश होता.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...