तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 परत आणण्याची शक्ती नाही”- अमित शाह

जम्मू:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्यात अनुच्छेद 370 परत लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या तीन पिढ्यांमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याची शक्ती नाही असे शाह यांनी ठणकावले. ते गुरुवारी उधमपूर येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी शाह म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात आम्ही काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा नक्कीच मिळेल, पण तो नरेंद्र मोदी देतील. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की, आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू. पण, जम्मू-काश्मीरला 70 वर्षे याच 2 कुटुंबांनी विभागून ठेवले. यापूर्वी राज्यात शांततेत निवडणुका होत नसत. नरेंद्र मोदींमुळे आज राज्यात शांततेत निवडणुका होत असल्याचे शाह यांनी सांगितले. काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ओमर अब्दुल्ला दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालायचे. अफल गुरुला फाशी देणे गरजेचे होते. जो कोणी दहशत पसरवेल त्याला फाशीनेच उत्तर दिले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद परत आणण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचे शाह यांनी बजावले. जम्मू आणि काश्मीरमधील 40 हजार लोकांच्या हत्येसाठी अब्दुल्ला आणि नेहरू जबाबदार आहे. ते उन्हाळ्यात लंडनमध्ये सुट्टी घालवत होते, महागड्या मोटारी चालवत होते. कोणत्याही पक्षाने नाही तर केवळ भाजपनेच जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट केला आहे. आत्ताच राहुल बाबा इथे आले होते, ते म्हणाले की इथे बाहेरचे लोक राज्य करतात. त्यांचा निशाणा उप-राज्यपालांवर होता. पण, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक राष्ट्रपती राजवट त्यांची आजी इंदिरा आणि वडील राजीव गांधी यांच्या काळात लावण्यात आली होती अशी टीका शाह यांनी केली. यापूर्वी कधीच लाल चौकात ताजिया मिरवणूक, गणपती मिरवणूक आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली नाही. आज लाल चौकातही गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. हा दृष्टिकोनाचा फरक आहे. घाटीत 33 वर्षांनंतर चित्रपटगृहे सुरू झाली. फारुख साहेब, तुमच्यामुळे 33 वर्षे सिनेमा हॉल बंद होते. जग जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एकीकडे एनसी, काँग्रेस आणि पीडीपी हे पक्ष जवळपास 40 वर्षांपासून या प्रदेशात दहशतवाद कायम ठेवत आहेत. दुसरीकडे, दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे शाह यांनी सांगितले. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वार्षिक हप्ता 6 हजारांवरून 10 हजारांपर्यंत वाढवणार आहोत. याशिवाय, जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार, मेट्रो आणणार आहोत. दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या 100 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन देखील गृहमंत्र्यांनी दिले.

सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेचा नवा पुतळा, हातात तलवा...
नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचा वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज, बुधवारी हा निर्णय झाला. महागाई भत्त्यातीलडीए वाढ स...

मुंबई एयरपोर्टवर तीन तस्कर अटक, 92.13 लाख रुपयेचा ...
मुंबई : एअर इंटेलिजेंस युनिट एआययूच्या टीमने 15-16 ऑक्टोबरच्या रात्री मुंबई एयरपोर्टवर तीन तस्करांना अटक केली आहे, ज्यात एक एयरपोर्ट कर्मचारी समाविष्ट आहे. एआययूच्या टी...

मालदीवमध्ये अडकलेल्या मुलाच्या सुटकेसाठी आईची वणवण...
भाईंदर: भाईंदर पूर्वच्या ऑरेंज हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या गायत्री पारीख यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकार आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे. त्यांचा मुलगा काही ...

मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संशयित अटक
मुंबई : मुंबई विमानतळावर बॉम्ब धमाक्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला सहार पोलिस ठाण्याच्या टीमने अटक केली आहे. या प्रकरणाची गहन चौकशी सुरू आहे.

मुंबईतील इमारतीत आग लागल्याने वृद्ध दांपत्यासह तीन...
मुंबई : ओशिवारा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत बुधवारी सकाळी आग लागल्याने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या नोकराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकांच्या चार गाड्या त...

वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली...

वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर ल...
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ठाकूर यांचा उमे...

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्...
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे ...

अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या मृतदेह ‘ओला’ मधून नेला
वसई:अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब लपविण्यासाठी आरोपीने पत्नीचा मृतदेह ओला मधून भावाच्य...

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.

Cyber Attack on Uttarakhand's Government System
Info released by court reveals document was leaked to lift pressure on PM.
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
Stay Connected
वसईचा आमदार मीच ! - आ. हितेंद्र ठाकूर
विरार - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बहुजन विकास आघाडीने आज विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या...
वसई विधानसभा: बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर लाडणार
वसई: वसई विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी रविवारी झालेल्या कार्यक...
गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
वसई- गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मं...